कोल्हापूर: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई ची मूर्तीच्या संवर्धनाला धोका निर्माण झाला असून मूर्तीच्या अनेक भागात झीज झाल असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप व रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे की काय अशी शंका निर्माण झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून मूर्ती ला स्नान घालण व दुग्धाभिषेक करणे बंद करण्यात आले आहे. मूर्तीची अवस्था सध्या अत्यंत नाजूक झाली असून मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
• गेली काही वर्षांपासून मूर्ती वर अभिषेक बंद:
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांची आई श्री करवीर निवासिनी अंबाबाई ची प्रकृती नाजूक झाले आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात आईचं एक रूप पाहण्यासाठी हे सर्व भक्त तासांचाच रांगेत उभारतात. मात्र अंबाबाईच्या या रूप आणि सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबाबाई ची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने आता त्याची झीज होत आहे.तर मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. दरम्यान पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. मात्र मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये असे सांगितले जाते मात्र कित्येक वर्ष अंबाबाईची मूर्ती अभिषेक न घालताच पुजली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन हे पहा दिले जात आहे.
• मूर्तीच्या अनेक भागाची झीज :
गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागाकडून मूर्तीला वज्रलेख आणि रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान देवीच्या ओठाना झालेली दुखापत लपविण्याठी तातडीने 18 आणि 19 सप्टेंबर रोजी एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया केली. पण त्यानंतर देवीचा चेहयावरील पुर्ण भावच बदलल त्यानंतर 26 जानेवारीला देवीच्या डाव्या कानाजवळील कपचा निघाला त्यामुळं श्रीपुजकांनी ही बाब 27 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली. कोर्टानं या संदर्भात 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली. पण बेजबाबदार सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणताच रिप्लाय दिला गेला नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मुर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसुन येतय.सध्या देवीची मूर्ती अत्यंत नाजूक स्थितीत असून देवीच्या पानपात्राचा जो हात आहे. त्या हाताचे दोन बोट पुर्णपणे झीजली आहे.तर म्हाळंग घेतलेल्या उजवा हाताची बोटाचीही पुर्ण झिज झाली आहे.तसेच पावलावरील बोटे पुर्णपणे निघुन गेली आहेत आणि देवीचे वहान असणारे सिंहाच्या पाठीमागील बाजु पुर्णपणे दिसेनासी झाली असून सिहाचा चेहराही अस्पष्ट झालाय तर देविच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट झालेत. यामुळे आता सरकार आणि पुरातत्व विभाग व देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
कोट: विद्यानृसिह भारती, करवीर पिठाचे शंकराचार्य
ज्या चुका आहेत देवीला कुठे काय झाल आहे हे दिसु नये म्हणुन शासनाने म्हणजेच व्यवस्थापन समीतीन लांबुन दर्शनाचा खेळ केलेला दिसुन येते. कोणत्याही मंदीरातील देवता ही निट स्वरुपात असलीच पाहिजे. तिच्या दर्शनाने प्रसन्नता प्राप्त व्हायला पाहिजे. जर तिच्या अंगाचे व्यंग होत असेल तर प्रसन्नता तर होणारच नाही पण भक्तांना क्लेश मात्र नक्की होतात. आपण कोणाचे दर्शन घेतो हे भक्तांना कळाल नाही तर हे बरोबर नाही. इतक्या लांबुन लोक दर्शनाला येतात त्यांना जर असं विकृत स्वरुप दिसायला लागल तर ते योग्य नाही.
कोट: प्रसन्न मालेकर: अंबाबाई मूर्ती अभ्यासक
अंबाबाई मूर्ती संवर्धन आणि वज्रलेपाचे अनेक वेळा प्रयत्न केले गेले आहेत 1920 साली मूर्तीच्या हातावर तांब्या पडला आणि दुखावला पण तेव्हापासून तो हात तसाच जोडून ठेवला आहे मूर्तीची संवर्धन प्रक्रिया अमलात येण्यासाठी 2015 उजाडले सध्या देवीच्या पाणपत्राचा जो हात आहे त्या हाताचे दोन बोटे पूर्णपणे निघून गेले आहेत पावलावरील बोटे पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे मूर्ती बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
0 Comments